हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर कमी होत असतानाच आज ९ ऑगस्ट रोजी भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. राज्यात पावसाला अनुकूल वातावरण असून. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला.

15 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह 15 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. देशभरात पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय. दिल्लीत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.

महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार तर, मुंबईतही राहणार पावसाचा जोर 

हवामान खात्याने पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रातील विविध भागांसाठी हवामानाचे इशारे जारी केले असून, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच आज मुंबईत दाट रिमझिम पावसाची शक्यता ९९% वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे हवामान दमट राहण्याची शक्यता आहे. दिवसभरात कमाल तापमान २९°C पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, तर किमान तापमान २६°C राहण्याचा अंदाज आहे.

तसेच ९ ऑगस्ट रोजी विशेषतः १२ वाजण्याच्या सुमारास, आकाशात थोडी मोकळीक दिसेल, परंतु पावसाची शक्यता ९९% कायम राहील. दुपारी ३ वाजता पावसाचा जोर वाढण्याची आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत तो हलका होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर, रात्री ९ नंतर पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरीही सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज

महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, नागपूर, गोदिंया, जालना, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. यासोबतच काही भागात 70 ते 75 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकते. यासोबतच जोरदार पाऊसही असेल. मात्र, यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही राज्यांत गारपिटीचीही शक्यता आहे. जोरदार वाऱ्यांमुळे मोठी झाडे पडू शकतात. गारपिटीचा इशारा देण्यात आला. गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज वर्तवला जात होता. आजही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला.

जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले

मराठवाड्यात समाधानकारक पाऊस झाला नसला तरी अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे जायकवाडी धरण शंभरीकडे वाटचाल करीत आहे. जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. जायकवाडी धरणातील भरलेल्या पाण्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहर आणि उद्योगावरील संकट आता पूर्णत टळले आहे.

दरम्यान भारतात राजस्थानच्या अनुपगढपासून दिल्ली, सिंधी ते पश्चिम बंगालच्या खाडीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

नाशिक जिल्ह्यामध्ये शनिवारी ८ ऑगस्ट रोजी रात्री पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर येत आहे. रात्री सुमारे 10 वाजण्याच्या दरम्यान 4.3 मॅग्निट्यूडचा भूकंप नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या…

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.त्यामुळे लहान मुलां तर याचं योग्य ज्ञान असणं फार महत्त्वाचं झालं आहे. याच पार्श्वभूमीवर लहान मुले व विद्यार्थ्यांना डिजिटल…

Leave a Reply

You Missed

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

रविवारचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरू शकते डोकेदुखी! या मार्गांवर असणार आहे ‘मेगा ब्लॉक’

रविवारचा प्रवास मुंबईकरांसाठी ठरू शकते डोकेदुखी! या मार्गांवर असणार आहे ‘मेगा ब्लॉक’

अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

अमित शहा शुक्रवारी रात्रीच मुंबईत पोहोचले;अचानक मुंबई दौरा का? नेमकं कारण कारण समोर आलं

तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

तुकाराम मुंढेंचा मुंबईत पुन्हा एक दणका! IIT पवईच्या कँटीनसह १० हॉटेल्सवर धाडी, 2 कँटीन थेट बंद, तर ४ परवाने निलंबित

पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल

पंतप्रधान मोदींच्या विदेश दौऱ्यांवर झालेत तब्बल एवढे कोटी खर्च; आकडा ऐकून धक्का बसेल

निर्दयीपणाचा कळस! अंत्यसंस्कारासाठी मुलींना वेळ नाही, वृद्धाश्रमात ५१०० रुपये पाठवले, व्हिडीओ कॉलवरच पाहिला वडिलांचा अंत्यविधी

निर्दयीपणाचा कळस! अंत्यसंस्कारासाठी मुलींना वेळ नाही, वृद्धाश्रमात ५१०० रुपये पाठवले, व्हिडीओ कॉलवरच पाहिला वडिलांचा अंत्यविधी