तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; विजयच्या TVK कडे 119 आमदारांचा पाठिंबा

तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या सहाव्या दिवशी अभिनेता विजय यांच्या टीव्हीके अर्थात तमिळगा वेत्री कळघम पक्षासाठी सरकार स्थापन करण्याचा मार्ग आता जवळपास मोकळा झाला आहे.

तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर व्हीसीके अर्थात विदुथलाई चिरुथैगल काची पक्षाने अखेर विजय यांच्या टीव्हीकेला अधिकृत पाठिंबा दिला आहे. व्हीसीकेचे अध्यक्ष थोल थिरुमावलवन यांनी टीव्हीके नेते अधव अर्जुन यांच्याकडे पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. या भेटीचा फोटोही आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हीसीकेच्या दोन आमदारांच्या पाठिंब्यापूर्वी टीव्हीकेकडे 116 आमदारांचा पाठिंबा होता. आता हा आकडा वाढून 119 वर पोहोचला असून, 234 सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यापेक्षा एकने अधिक झाला आहे.

दरम्यान, तामिळनाडूतील सत्तासमीकरणांमध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसने आपल्या पाच आमदारांना हैदराबादला हलवले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मेलूरचे आमदार पी. विश्वनाथन हे या आमदार गटाचे नेतृत्व करत आहेत. तसेच, विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यास पी. विश्वनाथन यांना मंत्रिपद मिळण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

या निवडणुकीत टीव्हीकेने 108 जागांवर विजय मिळवला. याशिवाय काँग्रेसचे 5, सीपीआयचे 2 आणि सीपीआय(एम)चे 2 आमदार आधीच विजय यांच्या बाजूने उभे राहिले होते. आता व्हीसीकेच्या पाठिंब्यानंतर विजय यांच्या सरकार स्थापनेचा दावा आणखी मजबूत झाला आहे.

तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता ते मुख्यमंत्री असा विजय यांचा प्रवास आता प्रत्यक्षात उतरणार का? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!

    श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप! प्रतिनिधी -संदेश घोलप, नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत भव्य प्रवेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील ‘नंदनवन’वर ऐतिहासिक सोहळा दक्षिण रायगडच्या राजकीय समीकरणांना…

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    प्रवाशांच्या समस्यांवर मनसेची भूमिका आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन मुंबई : मालाड रेल्वे स्थानकावर प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली आहे. स्थानकावर छताची अपुरी व्यवस्था, स्वच्छतागृहांची कमतरता,…

    Leave a Reply

    You Missed

    RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

    RTI वर महाराष्ट्र सरकारचा नवा नियम वादात! माहिती मिळवणे महाग होणार? सामाजिक कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

    श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!

    श्रीवर्धन. श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप!

    लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

    लातूरमध्ये उष्णतेचा कहर; शाळांची वेळ बदलली, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    वेसावा कोळीवाड्यात पाण्यासाठी जीव गेला? पाणीटंचाई, पंप जप्ती मोहीम आणि भूमिपुत्राच्या मृत्यूनंतर संताप

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    परभणीत मोठी दुर्घटना! यशवाडीतील हनुमान मंदिराचा भाग कोसळला; अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    मुंबई मेट्रो लाईन 3 मध्ये अखेर मोबाइल नेटवर्क सुरू; आरे जेव्हीएलआर ते कफ परेडपर्यंत Vi ची अखंड सेवा

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न?

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    रोहित पवारांच्या तीन दिवसीय उपोषणाने काय साधलं? सरकारच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!

    मालाड स्टेशनवरील प्रवाशांच्या समस्यांवर मनसे आक्रमक; स्टेशन मास्तरांना निवेदन, १० दिवसांचा अल्टिमेटम!