नाशिकवर ढगफुटी आणि अतिवृष्टीचे संकट; प्रशासनाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी,एनडीआरएफ तैनात अन् शाळा-कॉलेजला सुट्टी

नाशिक जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ तैनात करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेजलाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी अधिक पाऊस पडण्याची तसेच अतिवृष्टी, ढगफुटीसदृश परिस्थिती, पूरस्थिती, भूस्खलन, नैसर्गिक आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून नाशिकमध्ये NDRF पथक तैनात करण्यात आलेले आहे. नाशिक जिल्ह्यासाठी जारी करण्यात आलेला इशारा विचारात घेता शाळा आणि शैक्षणिक संस्थाना शनिवारी १ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाकडून काही आदेश जारी करण्यात आले आहेत.

शाळांना सुट्टी

खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव, बागलाण, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमधील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, अंगणवाड्या, आश्रमशाळा, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. नदी, नाले, ओढे, धरणे, तलाव, जलाशय, पूल, गड-किल्ले, घाट परिसर, पूरप्रवण भाग, डोंगर उतार आणि भूस्खलन संभाव्य भागात जाणे टाळावे.

पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद

जिल्ह्यातील सर्व धबधबे, धबधबा परिसर, ट्रेकिंग पॉईंट्स, नदीकाठ, पर्यटनस्थळे आणि पूरप्रवण धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत आहेत, नागरिकांना या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. संबंधित महसूल, पोलीस, वन विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक बॅरिकेडिंग करून प्रवेश प्रतिबंधित करावा.

सर्व आठवडी बाजार, जत्रा, मेळावे आणि मोठ्या सार्वजनिक गर्दीचे कार्यक्रम स्थगित करण्यात येत आहेत.

नागरिकांचे 100 टक्के सुरक्षित स्थळी स्थलांतर

महानगरपालिका आयुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व ग्रामपंचायती यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सखल, पूरप्रवण व भूस्खलनाच्या धोक्याच्या भागातील नागरिकांचे 100 टक्के सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. आवश्यकतेनुसार निवारा केंद्रे सुरू करून अन्न, पिण्याचे पाणी, औषधे व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सर्व रुग्णवाहिका कार्यरत ठेवाव्या. पूरप्रवण भागातील उच्च जोखीम असलेल्या गर्भवती महिलांची ओळख पटवून आवश्यकतेनुसार त्यांना सुरक्षित आरोग्य संस्थेत आगाऊ दाखल करण्याची कार्यवाही करावी. पशुसंवर्धन विभागाने पूरप्रवण भागातील जनावरांच्या सुरक्षित स्थलांतराची, चारा, पिण्याचे पाणी, पशुवैद्यकीय उपचार व तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करावी.

आवश्यक बॅकअप व्यवस्था

महावितरण कंपनीने धोकादायक भागात आवश्यकतेनुसार वीजपुरवठा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद अथवा पूर्ववत करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी. तसेच विद्युत वाहिनी / हायटेन्शन वायर, इत्यादीमुळे दुर्घटना होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.

सर्व दूरसंचार सेवा प्रदात्यांनी मोबाइल आणि इंटरनेट सेवा अखंडित राहतील यासाठी आवश्यक बॅकअप व्यवस्था आणि तांत्रिक पथके सज्ज ठेवावीत.

सर्व नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. केवळ भारतीय हवामान विभाग, राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मालाड विधानसभा क्षेत्रात आपल्या संघटनेची मूळ पकड अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षांतर्गत संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आगामी काळातील सामाजिक व राजकीय…

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

नवी मुंबईतील नेरुळ येथे काळसुरी ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. काळसूर ग्राम सेवा मंडळ मुंबई, काळसुरी ग्राम सेवा मंडळ काळसुरी आणि दुर्गादेवी आघाडी महिला मंडळ काळसुरी…

Leave a Reply

You Missed

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

कामात कुचराई खपवून घेणार नाही! मालाड विधानसभेत मनसेची मोठी मोर्चेबांधणी; १४ पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या;तर, १ वर्षाचा अल्टीमेटम

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी! नेरुळमध्ये भव्य रक्तदान शिबिर संपन्न; मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

स्वातंत्र्यदिन अन् रक्षाबंधनाचं लाडक्या बहि‍णींना मोठं गिफ्ट! खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम

समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

समृद्धी महामार्गावर महाड्रामा!RTO सोबत वाद, महामार्गावर ट्रक आडवा करून रागात चालक पसार; वाहनांच्या लाबंच लांब रांगा

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

प्रश्न २,१९२ कोटींचा! सरकारी निधीतून टेक कंपन्यांना कमी व्याजानं कोट्यवधींचं कर्ज? सरकारी ‘डीप-टेक’ निधीबाबत प्रश्नचिन्ह

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

10 सेकंदांचा थरार! नाशिकमध्ये ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, घराच्या भिंतीला तडे, तर लिफ्टमध्ये असताना हादरे

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

हवामान खात्याकडून पुढील ५ दिवसांचा इशारा! महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता; मुंबईत पावसाचा जोर कायम

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

सायबर सुरक्षेचे धडे! रवींद्र भारती शाळेत पटकर-वर्दैच्या ‘सायबर वॉरियर्स’कडून ऑनलाईन फसवणूक अन् गोपनीयतेबाबत मार्गदर्शन

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार

गणेशोत्सव! कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाचे मोठं गिफ्ट! धावणार ५,२२० जादा गाड्या; तर यंदा प्रवासादरम्यान या सुविधाही असणार