नाशिकवर ढगफुटी आणि अतिवृष्टीचे संकट; प्रशासनाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी,एनडीआरएफ तैनात अन् शाळा-कॉलेजला सुट्टी

नाशिक जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ तैनात करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून शाळा-कॉलेजलाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी अधिक पाऊस पडण्याची तसेच अतिवृष्टी, ढगफुटीसदृश परिस्थिती, पूरस्थिती, भूस्खलन, नैसर्गिक आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून नाशिकमध्ये NDRF पथक तैनात करण्यात आलेले आहे. नाशिक जिल्ह्यासाठी जारी करण्यात आलेला इशारा विचारात घेता शाळा आणि शैक्षणिक संस्थाना शनिवारी १ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाकडून काही आदेश जारी करण्यात आले आहेत.

शाळांना सुट्टी

खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, नांदगाव, बागलाण, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमधील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, अंगणवाड्या, आश्रमशाळा, अनुदानित, विनाअनुदानित, खासगी शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. नदी, नाले, ओढे, धरणे, तलाव, जलाशय, पूल, गड-किल्ले, घाट परिसर, पूरप्रवण भाग, डोंगर उतार आणि भूस्खलन संभाव्य भागात जाणे टाळावे.

पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे पूर्णपणे बंद

जिल्ह्यातील सर्व धबधबे, धबधबा परिसर, ट्रेकिंग पॉईंट्स, नदीकाठ, पर्यटनस्थळे आणि पूरप्रवण धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येत आहेत, नागरिकांना या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. संबंधित महसूल, पोलीस, वन विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवश्यक बॅरिकेडिंग करून प्रवेश प्रतिबंधित करावा.

सर्व आठवडी बाजार, जत्रा, मेळावे आणि मोठ्या सार्वजनिक गर्दीचे कार्यक्रम स्थगित करण्यात येत आहेत.

नागरिकांचे 100 टक्के सुरक्षित स्थळी स्थलांतर

महानगरपालिका आयुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी व ग्रामपंचायती यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सखल, पूरप्रवण व भूस्खलनाच्या धोक्याच्या भागातील नागरिकांचे 100 टक्के सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. आवश्यकतेनुसार निवारा केंद्रे सुरू करून अन्न, पिण्याचे पाणी, औषधे व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सर्व रुग्णवाहिका कार्यरत ठेवाव्या. पूरप्रवण भागातील उच्च जोखीम असलेल्या गर्भवती महिलांची ओळख पटवून आवश्यकतेनुसार त्यांना सुरक्षित आरोग्य संस्थेत आगाऊ दाखल करण्याची कार्यवाही करावी. पशुसंवर्धन विभागाने पूरप्रवण भागातील जनावरांच्या सुरक्षित स्थलांतराची, चारा, पिण्याचे पाणी, पशुवैद्यकीय उपचार व तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करावी.

आवश्यक बॅकअप व्यवस्था

महावितरण कंपनीने धोकादायक भागात आवश्यकतेनुसार वीजपुरवठा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद अथवा पूर्ववत करण्याबाबत तात्काळ कार्यवाही करावी. तसेच विद्युत वाहिनी / हायटेन्शन वायर, इत्यादीमुळे दुर्घटना होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.

सर्व दूरसंचार सेवा प्रदात्यांनी मोबाइल आणि इंटरनेट सेवा अखंडित राहतील यासाठी आवश्यक बॅकअप व्यवस्था आणि तांत्रिक पथके सज्ज ठेवावीत.

सर्व नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. केवळ भारतीय हवामान विभाग, राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.

Amol Bhalerao

अमोल भालेराव

अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

Related Posts

ओसंडून वाहणारा डॅम अन् महादेवाचे जागृत देवस्थान; श्रावणाआधीच श्रीवर्धनमधील ‘जावेळे’ गाव पर्यटकांनी बहरलं

श्रावण महिन्याचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. श्रीवर्धन तालुक्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या जावेळे येथील ऐतिहासिक व अत्यंत जागृत अशा ‘श्री स्वयंभू शिवशंकर जावळेश्वर देवस्थान’ परिसरात श्रावणारंभाची जय्यत तयारी…

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली;शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांचा ताजा अहवाल काय सांगतो?

मुंबईमध्ये पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. शुक्रवार सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू असून काही भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे.मात्र यामुळे मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या दमदार पावसामुळे…

Leave a Reply

You Missed

पहिल्याच पावसात फुटला फुगा! अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळा बांधकामात मोठा भ्रष्टाचार, धातूऐवजी सिमेंट; 30 लाखांच्या पुतळ्याचे पावसामुळे सत्य उघड

पहिल्याच पावसात फुटला फुगा! अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळा बांधकामात मोठा भ्रष्टाचार, धातूऐवजी सिमेंट; 30 लाखांच्या पुतळ्याचे पावसामुळे सत्य उघड

ओसंडून वाहणारा डॅम अन् महादेवाचे जागृत देवस्थान; श्रावणाआधीच श्रीवर्धनमधील ‘जावेळे’ गाव पर्यटकांनी बहरलं

ओसंडून वाहणारा डॅम अन् महादेवाचे जागृत देवस्थान; श्रावणाआधीच श्रीवर्धनमधील ‘जावेळे’ गाव पर्यटकांनी बहरलं

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार, नव्या पिढीच्या संघर्षाची अन् सामाजिक परिवर्तनाची दिशा,सांस्कृतिक वारसा अन् नव्या पिढीची जबाबदारी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार, नव्या पिढीच्या संघर्षाची अन् सामाजिक परिवर्तनाची दिशा,सांस्कृतिक वारसा अन् नव्या पिढीची जबाबदारी

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली;शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांचा ताजा अहवाल काय सांगतो?

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली;शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांचा ताजा अहवाल काय सांगतो?

काय ही शासनाची उदासीनता? पक्क्या रस्त्याअभावी गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ

काय ही शासनाची उदासीनता? पक्क्या रस्त्याअभावी गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ

नाशिकवर ढगफुटी आणि अतिवृष्टीचे संकट; प्रशासनाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी,एनडीआरएफ तैनात अन् शाळा-कॉलेजला सुट्टी

नाशिकवर ढगफुटी आणि अतिवृष्टीचे संकट; प्रशासनाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी,एनडीआरएफ तैनात अन्  शाळा-कॉलेजला सुट्टी

तुकाराम मुंढेंचा दणका; FDA कडून थेट हायकोर्टाच्या कँटीनला बंद करण्याची नोटीस

तुकाराम मुंढेंचा दणका; FDA कडून थेट हायकोर्टाच्या कँटीनला बंद करण्याची नोटीस

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली, नऊ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू, अनेकजण जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली, नऊ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू, अनेकजण जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

चाकरमान्यांसाठी खुशखबर! गावी जाणाऱ्या नोकरदारांसाठी गणेशोत्सवासानिमित्त रेल्वे प्रशासनाकडून खास गिफ्ट

चाकरमान्यांसाठी खुशखबर! गावी जाणाऱ्या नोकरदारांसाठी गणेशोत्सवासानिमित्त रेल्वे प्रशासनाकडून खास गिफ्ट