मोठी बातमी! इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग;पाच जणांचा मृत्यू ,तर ४१ जण बेपत्ता

इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ एका प्रवासी जहाजाला आग लागल्याची मोठी घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून ४१ जण बेपत्ता झाल्याचं समोर आलं आहे. घटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. इंडोनेशियाच्या बचाव संस्थेनुसार आग लागली तेव्हा जहाजावर २७१ प्रवासी आणि कर्मचारी होते. रविवार दुपारपर्यंत किमान २२५ जणांना वाचवण्यात यश आलं आलं आहे. अद्याप बेपत्ता असलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बचाव कार्यासाठी अनेक जहाजे तैनात

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व जावा प्रांतातील सुराबाया येथून दक्षिण सुलावेसीमधील मकासारकडे जात असताना, जावाच्या ईशान्य किनाऱ्याजवळील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग लागली. बचाव कार्यासाठी अनेक जहाजे तैनात करण्यात आली आहेत. अधिकारी आजूबाजूच्या पाण्याच्या क्षेत्रात शोधमोहीम सुरु आहे.

अशीच एक घटना वर्षभरापूर्वी घडली होती

दरम्यान जहाजाला आगीचं कारण सध्या स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान अशीच एक घटना, एका वर्षापूर्वी इंडोनेशियामध्ये घडली होती. जुलै २०२५ मध्ये, उत्तर सुलावेसी प्रांताजवळ एका प्रवासी जहाजाला आग लागली होती, ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला. सुमारे १५० लोकांना वाचवण्यात यश आलं होतं. केएम बार्सिलोना ५ नावाच्या या जहाजावर २८० लोक प्रवास करत होते. ही घटना १९ जुलै रोजी राजधानी मनाडो जवळ घडली होती.

इंडोनेशियामध्ये असे अपघात सर्रास घडतात

यापूर्वी २०२१ मध्ये, टर्नेटहून निघाल्यानंतर थोड्याच वेळात केएम कार्या इंदाह या जहाजाला मोलुक्का समुद्रात आग लागली. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना पाण्यात उडी मारण्यास भाग पडले. अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक मच्छीमार बोटींनी २२ मुलांसह १८१ प्रवासी आणि १४ कर्मचाऱ्यांची सुटका केली. १७,००० हून अधिक बेटांचा समावेश असलेल्या जगातील सर्वात मोठ्या द्वीपसमूह राष्ट्र, इंडोनेशियामध्ये असे अपघात वारंवार घडत असल्याचं समोर आलं आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    गोवंश हत्या बंदी कायदा: सुप्रीम कोर्टाकडून तमिळनाडूत स्थगिती

    गोवंश हत्या बंदी कायदा: सुप्रीम कोर्टाकडून तमिळनाडूत स्थगिती नवी दिल्ली: देशातील कायदेशीर आणि राजकीय वर्तुळात अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या गोवंश हत्या बंदी कायदा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने (Who) एक अत्यंत महत्त्वपूर्ण…

    व्हिएतनाम बोट अपघात: ३२ भारतीय पर्यटकांची बोट बुडाली

    व्हिएतनाम बोट अपघात: ३२ भारतीय पर्यटकांची बोट बुडाली, समुद्रात मोठी दुर्घटना दक्षिण-पूर्व आशियातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या व्हिएतनाममधून एक अत्यंत चिंताजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. व्हिएतनामच्या समुद्रात ३२…

    Leave a Reply

    You Missed

    भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई

    भिवंडी इमारत दुर्घटनेबाबत महत्त्वाची अपडेट! अपघातानंतर पोलीस आणि प्रशासनाची मोठी कारवाई

    मोठी बातमी! इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग;पाच जणांचा मृत्यू ,तर ४१ जण बेपत्ता

    मोठी बातमी! इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग;पाच जणांचा मृत्यू ,तर ४१ जण बेपत्ता

    ३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर; मुंबई, पुणे, नाशिकसह या जिल्ह्यांना रेट अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा

    ३ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर; मुंबई, पुणे, नाशिकसह या जिल्ह्यांना रेट अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा

    पहिल्याच पावसात फुटला फुगा! अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळा बांधकामात मोठा भ्रष्टाचार, धातूऐवजी सिमेंट; 30 लाखांच्या पुतळ्याचे पावसामुळे सत्य उघड

    पहिल्याच पावसात फुटला फुगा! अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळा बांधकामात मोठा भ्रष्टाचार, धातूऐवजी सिमेंट; 30 लाखांच्या पुतळ्याचे पावसामुळे सत्य उघड

    ओसंडून वाहणारा डॅम अन् महादेवाचे जागृत देवस्थान; श्रावणाआधीच श्रीवर्धनमधील ‘जावेळे’ गाव पर्यटकांनी बहरलं

    ओसंडून वाहणारा डॅम अन् महादेवाचे जागृत देवस्थान; श्रावणाआधीच श्रीवर्धनमधील ‘जावेळे’ गाव पर्यटकांनी बहरलं

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार, नव्या पिढीच्या संघर्षाची अन् सामाजिक परिवर्तनाची दिशा,सांस्कृतिक वारसा अन् नव्या पिढीची जबाबदारी

    लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार, नव्या पिढीच्या संघर्षाची अन् सामाजिक परिवर्तनाची दिशा,सांस्कृतिक वारसा अन् नव्या पिढीची जबाबदारी

    मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली;शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांचा ताजा अहवाल काय सांगतो?

    मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली;शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांचा ताजा अहवाल काय सांगतो?

    काय ही शासनाची उदासीनता? पक्क्या रस्त्याअभावी गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ

    काय ही शासनाची उदासीनता? पक्क्या रस्त्याअभावी गर्भवतीला खाटेवरून रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ

    नाशिकवर ढगफुटी आणि अतिवृष्टीचे संकट; प्रशासनाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी,एनडीआरएफ तैनात अन् शाळा-कॉलेजला सुट्टी

    नाशिकवर ढगफुटी आणि अतिवृष्टीचे संकट; प्रशासनाकडून पावसाचा रेड अलर्ट जारी,एनडीआरएफ तैनात अन्  शाळा-कॉलेजला सुट्टी