पावसाच्या आगमनाने राज्यात वळवळ: पुण्यात होर्डिंग कोसळले, जालन्यात येलो अलर्ट, कोकणात मुसळधार सरी

मुंबई, पुणे, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट, आणि वादळी वाऱ्यांमुळे राज्यातील हवामानात अचानक बदल झाला असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे.

पुण्यात मुसळधार पाऊस आणि होर्डिंग कोसळल्याची घटना

पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली असून, शहराच्या मध्यवर्ती भागांत जोरदार सरी कोसळल्या. पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळील सणसवाडी येथे एक मोठं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. या होर्डिंगखाली 7 ते 8 दुचाकी अडकल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विमानतळ परिसरातही मुसळधार पावसामुळे नव्या टर्मिनलवर पाणी साचलं. ड्रेनेज लाईनमधून पाणी बाहेर येत असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. एकीकडे पाऊस आणि दुसरीकडे वादळी वाऱ्यांमुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघालं आहे.

जालन्यात अवकाळी पावसाचा कहर – लग्न मंडप कोसळला

जालना जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून अवकाळी पावसाचा जोर कायम आहे. आज सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. राजुर रोडवरील एका मंगल कार्यालयातील लग्नाचा मंडप कोसळला आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केला असून, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सोलापुरात पहिल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा

सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, करमाळा, आणि पंढरपूर परिसरात पूर्व मोसमी पावसाने दमदार सुरुवात केली आहे. या पावसामुळे शेतांमधून पाणी वाहून गेलं असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाण्याच्या अभावामुळे संकटात सापडलेली लहानसहान पिकं या पावसामुळे वाचली आहेत.

कोकणात धुव्वाधार पाऊस, वीजपुरवठा खंडित

तळकोकणातील कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यांमध्ये मुसळधार पावसासोबत वादळी वाऱ्यांचाही जोर आहे. विजांच्या कडकडाटासह 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहत असून, संपूर्ण जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. गुहागर तालुक्यातही अर्ध्या तासापासून सुरू असलेल्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

जामनेरमध्ये वीज कोसळून चार म्हशी ठार

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील सुनासगाव येथे वीज कोसळून चार म्हशी जागीच ठार झाल्या आहेत. शेतकरी गोपाल इंधाते यांच्या परिवारातील या म्हशी त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होत्या. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून महिलांचा आक्रोश हृदयद्रावक होता.

राज्याच्या विविध भागांमध्ये सुरू असलेल्या वळवाच्या पावसामुळे अनेक ठिकाणी जीवनमानावर परिणाम झाला आहे. काही भागात दिलासादायक स्थिती असली तरी, काही ठिकाणी या पावसामुळे हानीही झाली आहे. प्रशासनाकडून हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

  • Amol Bhalerao

    अमोल भालेराव

    अमोल भालेराव हे एक अनुभवी पत्रकार आणि 'जागृत महाराष्ट्र' न्यूज चॅनलचे संस्थापक-संपादक आहेत. महाराष्ट्रातील घडामोडी, विशेषतः राजकीय आणि सामाजिक विषयांवर अचूक आणि सखोल वार्तांकन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी ते ओळखले जातात. श्री. भालेराव यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमीच सामान्य माणसाचे प्रश्न आणि आवाज सरकारदरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 'जागृत महाराष्ट्र' या त्यांच्या न्यूज पोर्टल आणि यूट्यूब चॅनलद्वारे ते दररोज प्रेक्षकांपर्यंत ताज्या बातम्या आणि विश्लेषणात्मक कार्यक्रम पोहोचवतात. निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारिता हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. एक संपादक म्हणून, ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांना स्थान देण्यावर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा घडवून आणण्यावर भर देतात. त्यांच्या नेतृत्वाखाली 'जागृत महाराष्ट्र'ने अल्पावधीतच डिजिटल मीडियामध्ये आपले एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे.

    Related Posts

    80s व्हायरल ट्रेंड की जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा नवा फंडा?

    देशात सध्या ८०च्या दशकातील (1980s) ट्रेंड पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘80s AI Photo Trend’ तसेच त्या काळातील फॅशन आणि पॉप कल्चरशी संबंधित…

    झारखंडच्या विद्यार्थी आंदोलनापासून ढाब्यावरच्या त्या सोळा वर्षांच्या मुलापर्यंतचा प्रश्न…

    खरकटी भांड्यांत हरवलेलं बालपण…. ज्या वयात त्याच्या हातात भविष्याची स्वप्नं, पुस्तकं आणि खेळण्याचं साहित्य असायला हवं होतं, त्या हातात जेवण झाल्यानंतर उरलेली खरकटी भांडी होती. एका हातात कापड होतं आणि…

    Leave a Reply

    You Missed

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्टच्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार; २४ सप्टेंबरनंतर  खात्यात जमा होणार १५०० रुपये, तांत्रिक अडचणींमुळे झाला होता विलंब

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    हे कधी थांबणार? लालबागच्या राजाच्या दरबारात VIP ना रेड कार्पेट, सामान्यांना माञ धक्काबुक्की; तर, दुसरीकडे कार्यकर्त्यांची दादागिरी अन् पोलिसांची मुजोरी

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    रायगडमध्ये संजय मानाजी कदम यांचा दौरा थेट जनतेच्या मनाला भिडला! दिवस-राञ एक करून जिल्ह्याची पाहणी, शिवसैनिकांमध्येही नवा उत्साह

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    लंडन दौऱ्याहून मुंबईत परतत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आयफोन विमानातच राहिला? फोन शोधण्यासाठी मध्यरात्री पोलिसांची धावपळ

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    हॉटेलनंतर आता रुग्णालये टार्गेटवर! तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांतील साहित्याच्या लुटमारीचा पर्दाफाश; थेट केंद्र सरकार आणि NPPA कडे तक्रार

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    मनोज जरांगे पाटलांनी अखेर २० दिवसांनी उपोषण सोडलं; प्रकृती खालावली, उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    “मी त्यांना कधी भेटलो नाही, ओळखतही नाही” सीबीआय एफआयआरनंतर आदित्य ठाकरेंची पहिल्यांदाच प्रतिक्रिया समोर

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    सोन्या-चांदीचे दागिने, नोटांचे हार अन्…लालबाग राजाच्या चरणी पहिल्याच दिवशी लाखोंची देणगी, अवघ्या दोन दिवसांत जमा झाले कोट्यावधी

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा

    बोरीवलीत वीर सावरकर उद्यानातील विसर्जन बंदीवरून माजी खासदार गोपाळ शेट्टी आक्रमक; थेट पोलीस उपायुक्तांना पत्र,प्रशासनाला आक्रमक इशारा